Wednesday, 9 May 2018

नाशिक विभाग- दोन दिवसीय अनिवासी शिबीर_श्रीमती ब.गो.शानबाग विद्यालय,सावखेडा ता.जि.जळगाव



शाळेचे नाव- श्रीमती ब.गो.शानबाग विद्यालय,सावखेडा ता.जि.जळगाव
शिबिराचा मुख्य विषय- घनकचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन
दिनांक- ०५-०३-२०१८ आणि ०६-०३-२०१८
शिबिराचे गाव-वैजनाथ ता.एरंडोल जि.जळगाव
पहिला दिवस:- ०५-०३-२०१८
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत शाळा आणि समुदाय पातळीवर दोन दिवसीय अनिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराला ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,सकाळी ठीक १० वा. शिबिराला सुरुवात झाली,हजेरी घेण्यात आली.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी श्री.विठ्ठल श्रावण गायकवाड,उपसरपंच श्री.नाना नवल पाटील,ग्रामपंचायत सदस्य, योजनाप्रमुख श्री जितेंद्र पाटील आणि श्री.बडगुजर,,प्रकल्प अधिकारी जगदीश ठाकूर नाशिक विभाग हे उपस्थित होते.
            नाशिक विभागाचे विभाग समन्वयक जगदीश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शिबिराचा उद्देश आणि रूपरेषा समजावून सांगितली,विद्यार्थ्यांचे गट पाडून देण्यात आले,विद्यार्थी हे ग्रामपंचायत कार्यालय जवळ एकत्र जमले त्यानंतर वैजनाथ गावात सर्व विद्यार्थी गावामध्ये प्रभात फेरीसाठी गावाकडे रवाना झाले.प्रभातफेरी द्वारे गावात जनागृती हा उद्देश होता.कचरा वर्गीकरण बाबत (स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे; कचरा कुंडिचा वापर करू,सुंदर परिसर निर्माण करू; स्वच्छ घर, सुंदर परिसर,कचरा कुंडीचा करुया वापर; स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर;ई कचरा आरोग्यास खतरा; कुजणारा आणि न कुजणारा कचरा वेगळा करा, निसर्गाच्या नियमांचे पालन करा इ) घोषणा देण्यात आल्या,घोषणा फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट व्हावे कुटुंबाना कुजणारा आणि न-कुजणारा कचरा वर्गीकरण व्हावा यासाठी प्रत्येकी २ खोके असे एकूण ५० खोके कुटुंबाना वाटप करण्यात आले.गावातील कचरा टाकण्याचे ठिकाणे-उकिरडे,कचरा डेपो या बाबत गावाचा कचरा संदर्भात नकाशा काढण्यात आला.ज्यामध्ये गावातील उकिरडे,कचरा टाकण्याची ठिकाणे,विद्यार्थ्यांनी प्रश्नावली च्या सहाय्याने कचरा विल्हेवाट बाबत गावाची सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी श्री. श्री.नाना नवल पाटील यांना प्रश्न विचारले (सोबत प्रश्नावली आणि विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न उत्तर जोडले आहे) त्यामध्ये सध्या कचरा गोळा करण्यासाठी पद्धती,कचरा पेटी,कचरा टाकण्याची ठिकाणे,निधी इ.
            गावामध्ये प्रभातफेरी,जनजागृती झाल्यानंतर सर्व विद्याथी ग्रामपंचायत कार्यालय जवळ सावलीत एकत्र जमा झाले,काही काळ विश्राम झाल्यावर गावामधील महत्वाचे ठिकाणे ग्रामपंचायत फळा,महत्वाचे चौक,प्राथमिक शाळा, इ.ठिकाणे प्लॉस्टिक,ई-कचरा,कुजणारा आणि न-कुजणारा कचरा याबाबत माहितीपत्रके चिटकविण्यात आले.शाळेत परत आल्यावर विद्यार्थ्यांनी जेवण केले,त्यानंतर गावाचा नकाशा,ग्रामपंचायत प्रश्नावली आणि इतर उर्वरित कामे पूर्ण करण्यात आले.आलेले अनुभव एकमेकांना सांगितले, दुसऱ्या दिवसाचे नियोजन करण्यात आले,अश्या प्रकारे शिबिराचा पहिला दिवस पार पडला.

दुसरा दिवस- ०६-०३-२०१८
दुसऱ्या दिवशी वैजनाथ गावात विद्यार्थी सकाळी ८:०० वा. उपस्थित झाले,हजेरीघेण्यात आली,ग्रामपंचायत जवळ एकत्र झाल्यावर विद्यार्थिनिनी गावातील महिला आणि विद्यार्थ्यांनी पुरुष मंडळीना कार्यक्रमासाठी पुनश्च निमंत्रित करण्यात आले.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्री.विठ्ठल श्रावण गायकवाड,उपसरपंच श्री.नाना नवल पाटील,ग्रामपंचायत सदस्य,योजना प्रमुख शिक्षक,विद्यार्थीनिनी गावातील नागरिकांना  एकत्र करून कचरा आणि प्लास्टिक प्रश्न सोडवण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली.त्यामध्ये स्वच्छता या विषयी  नाटिका सादर करण्यात आली,नागरिकांना  कचरा वर्गीकरण हा विषय खेळाच्या माध्यमातून समजण्यासाठी प्रकल्प अधिकारी जगदीश ठाकूर यांनी ‘कचरा वर्गीकरण’ खेळ घेतला यामध्ये भाज्यांचे देठ,फळांचेसाल,प्लॅस्टिक,कापड,लोखंड,थर्माकॉल,ई-कचरा,जैववैद्यकीय कचरा,कागद यासारखे मिश्र कचरा टाकण्यात आला आणि त्याचे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांसोबत प्रात्यक्षिक घेण्यात आले,या माध्यमातून घरामध्ये कचरा कश्या पद्धतीने वेगळा करायचा याबाबत माहिती दिली,प्लास्टिक,इलेक्ट्रोनिक कचरा,जैववैद्यकीय या कचऱ्याची वर्गवारी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

            सागर मित्र अभियान चे प्रतिनिधी श्री.विशाल सोनकुल  यांनी सागर मित्र अभियान बाबत माहिती दिली तसेच प्लास्टिक चे मानव आणि निसर्ग यांवर होणारे गंभीर परिणाम,समुद्रातील जलचर यांच्यावर होणारा परिणाम याबाबत गांभीर्य विद्यार्थी आणि नागरिकांना पटवून दिले,तसेच गावातील प्लास्टिक हे इतरत्र न फेकता गावामध्ये एक “सागर मित्र बॅग” ग्रामपंचायत कार्यालय जवळ लावण्यात आली, बाजाराला प्लॅस्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरावी,याचे उद्घाटन सरपंच आणि ग्रामस्त यांच्या हस्ते करण्यात आले.ज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या रॅपर्स जमा केले जाईल आणि हि प्लास्टिक बॅग भरल्यानंतर जळगाव येथील नेहा रिसायकलिंग एजन्सी ला सुपूर्त करण्यात येईल,जेणेकरून गावातील प्लास्टिक समस्या सोडवण्यास नक्कीच मदत होईल,तसेच प्लास्टिक वापर कमी आणि कापडी पिशवी जास्तीत जास्त वापरावी याबाबत आवाहान करण्यात आले.अश्या पद्धतीने दोन दिवसीय अनिवासी शिबीर पार पडले. 
गावकऱ्यासमोर स्वच्छ गाव नाटिका सादर करताना विद्यार्थी
 
घनकचरा वर्गीकरण खेळाच्या माध्यमातून समजावून सांगताना विभाग समन्वयक

वैजनाथ गावातील प्लास्टिक पिशवी संकलन साठी सागर मित्र ची  बॅॅग लावण्यात आली आहे.