Monday, 22 September 2014


रोपवाटिका...एक हरित पाउल.

परिसंस्था म्हणजे जैविक व अजैविक गोष्टींच्या सहसंबंधातून तयार झालेला समूह. निसर्गाच्या विविध चक्रातून उदा. जलचक्र, नायट्रोजन चक्र ई. च्या माध्यमांतून त्यांचा सहसंबंध जपला जातो. परीसंस्थेमध्ये स्थानिक वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर तसेच कीटक हे गुंतागुंतीचे जीवन जाळे तयार करतात. त्या सर्वांचे अस्तित्व हे एकमेकाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जीवन आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांवर विसावणे हे परीसंस्थेचे वैशिष्ट्य या संपूर्ण जीवांची गुंतागुंतीचे विविध जाळे विणतो जसे कि अन्नजाळे व जीवन जाळे व प्रत्येकाला वेगळे महत्व प्रदान करतो. हेच जाळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास व स्थिरावण्यास मदत करतात. परिसंस्थेमध्ये झाडांचे एक विशेष स्थान आहे. निसर्गात प्राथमिक उत्पादक व अन्न साखळीची प्रथम व महत्वाची कडी अशी भूमिका त्यांना एक आदराचे स्थान देवून जाते. वराह पुराणामध्ये असे लिहिले आहे की

यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम्
तावत् तिष्ठन्ति मेदिन्यां संतति पुत्र पौतृकी II
देहन्ते परमं स्थानम् यतसुरैरपि दूर्लभम् I
प्राप्नोति पुरूषोनित्यं महामाया प्रसादतः II

 याचा अर्थ असा कि जो पर्यंत या पृथ्वीवर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत तोपर्यंत जीवांची उत्पती होऊन ते सुखाने जगतील. ज्यांना ही गोष्ट कळेल त्यांना महामायेच्या (निसर्गदेवतेच्या) प्रसादासह देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल (संधर्भ: आपले वृक्ष- श्री. द. महाजन). पक्ष्यांसमवेत इतर जीवांसाठी खाद्य, निवारा तसेच घरट्यासाठी काड्या पाने, फुलपाखरे विशिष्ट झाडांच्या पानांवर अंडी घालतात व नंतर त्याच्या आळ्या सदर पाने खातात. जमिनीवर गळून पडलेली पाने कुजल्यावरती त्यातील पोषकद्रव्ये मातीत मिसळून जमिनीची पोत वाढविण्यास तसेच जलचक्र अबाधित ठेवण्यातही मदत करतात. एक झाड हे जणू एक परिसंस्था असते ती निसर्गातील प्रत्येक सजीवाच्या सहजीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमणे निसर्गातील इतर अजैविक घटकांच्या बाबतीत ही महत्वाची भूमिका निभावतात जसे कि माती ची धूप वाचविण्यास, बाष्पोत्सार्जन प्रक्रियेद्वारे जल चक्रात अशा पारंपरिक प्रकीरियेत व नवीन माहितीतून पुढे आलेल्या माहितीनुसार ध्वनी कंपने शोषुन ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मदत करतात. एकंदरीतच निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये झाडांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे स्थानिक वृक्षांचे महत्व अधिक वाढते.
आपल्या भागात नैसर्गिक रीतीने वाढणारे वृक्ष ते आपले वृक्ष! दुर्दैवाने, स्थानिक वृक्ष, जीवन जाळीची एक महत्वाची कडी, धोकादायक वेगाने नष्ट होत आहेत. एखाद्या स्थानिक वृक्षाच्या प्रजातीचे नष्ट होणे म्हणजे त्या परीसंस्थेतील त्या वृक्षावर अवलंबून असणारा कीटक प्रजाती नष्ट होतील म्हणजेच त्या किटकाचे भक्षण करणारा पक्षी देखील नष्ट होण्याची शक्यता असते. आपणा सर्वांनातर डोडो पक्षी व कॅल्वेरिया मेजर या झाडाची गोष्ट माहितीच आहे, डोडो पक्ष्याची प्रजाती समूळ नष्ट झाल्यावरती सदर झाडाचे बीज प्रसारण झालेच नाही व जी प्रक्रिया त्या बियांवरती अन्ननलीकेतून होत असायची ती प्रक्रिया बंद झाल्याने कॅल्वेरिया मेजर हि  झाडांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या परिसरात ही अशी सहसंबधाची बरीच उदाहरणे दिसून येतात, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका हा स्थानिक जातींच्या झाडांचे कमी होणारे प्रमाणे एकंदरीत काय तर अधिवास नष्ट-प्रजाती नष्ट!
महाराष्ट्राला पश्चिम घाटाच्या माध्यमातून समृद्ध अशी वनसंपदा व वन्यजीवांची संपत्ती लाभली आहे. गेले हजारो वर्ष मनुष्य ही निसर्ग संपत्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात उपभोगत आहे. दैनंदिन उपजीविकेसाठी जंगलातील विविध घटकांचा वापर हा काही नवीन नाही व तेवढाच पर्यावरण पूरक होता कारण कि तो संतुलित वापर असायचा. परंतु, वाढत चाललेली लोकसंख्या, औद्योगीकरण, प्रदूषण, जंगलतोड, वणवा, चराई आणि खाणकाम अशा प्रश्नांनी जंगले नाहीसे होत चालली आहेत. न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव हे रत्नागिरीतील पश्चिम घाटात वसलेले एक खेडे गाव. पूर्वी निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव आता विकासाच्या व बदलत्या शेती पद्धती व आंबा व काजू सारख्या एकसुरीच्या लागवडीमुळे इतर झाडांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. एकेकाळी मुबलक असणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींचे प्रमाण कमी होत चालले असल्याचे एकंदरीतच परिसराचा अभ्यास व पाहणी केल्या असता तसेच जुन्या जाणत्या नागरिकांच्या बोलण्यातून जाणवते. अर्थातच ही सुरुवात आहे व जे काही भविष्यात होणार आहे ते पर्यावरण अथवा मनुष्य या दोघांच्याही हिताचे नव्हते. सदर परिस्थीची गंभीरता ज्या वेळेस विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली त्यावेळी हे सर्व विधारक होते ज्या वेळीस त्यांना पूर्व व सद्य स्थितीचा फरक समजाविण्यात आला तसेच स्थानिक व विदेशी वृक्ष कोणते; विदेशी वृक्षांचे अपाय काय व त्यांच्या लागवडीमुळे ओढवणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो हे सांगितल्यानंतर त्यांनाही काहीतरी नवीन करण्याची उर्मी आली. चर्चेअंती असे ठरविण्यात आले होते कि स्थानिक प्रजातींच्या रोपांची रोपवाटिका करून त्यांचे वृक्षारोपण शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला तसेच पडीक जमिनीवरती इत्यादी ठिकाणी करावयाचे. कोणत्या प्रजातीची रोपे लावावीत, रोपवाटिका कशी तयार करावी, कुंपणे, खते, पुरण भरणे इत्यादी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण योजना प्रमुख श्री. सचिन पाटील यांना पर्यावरण शिक्षण केद्र आयोजित प्रशिक्षण कार्यशाळे दरम्यान मिळाले व या उपक्रमाच्या नियोजन ते अंमलबजावणी च्या प्रत्येक टप्प्यास मार्गदर्शक ठरले. नियोजनाप्रमाणे स्थानिक प्रजातीचे लहान रोपे आणून त्यांची शाळेच्या आवारात छोटीशी रोपवाटिका तयार करून काही कालावधीनंतर त्यांचे रोपण करायचे निश्चित झाले. याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी ५० विद्यार्थ्यांचे ५ विद्यार्थ्यांचा एक असे एकूण १० गट पाडण्यात आले व रोपावाटीकेची कार्ये ही वाटून देण्यात आली. देशात एक मुल एक झाड असा कार्यक्रम राबवीत असताना येथे एका विद्यार्थी ३ टे ४ रोपांची पूर्ण निगा राखत होता! या संपूर्ण प्रक्रियेदरम्याण एक महत्वाचा बदल नकळत घडत होता; तो म्हणजे “रोपटे व विद्यार्थी यांच्यातील नाते”. फक्त वृक्षारोपण करून सदर कार्य संपत नसून लावलेली रोपे ही जगली पाहिजेत व ती विद्यार्थ्यांच्या सहाय्याने जगवली पण पाहिजेत ही काहीशी अडचणीची वाटणारी गोष्ट या स्थापित झालेल्या नवीन नात्यामुळे सहज शक्य अशी भासू लागली.
रोपावाटीकेची सुरवात विविध झुडूप वर्गीय, औषधी, फळझाडे इत्यादी विविध प्रकारची रोपांच्या संकलाणाने सुरु झाली.
रोप
संख्या
कोरफड
अडुळसा
मावडा
ओवा
कडुलिंब
गवती चहा
कडीपत्ता
१५
कोकम
दालचिनी
आंबा
६२
गुलाब
२५
काजू
१३
पेरू
चिकू
तेरवड
एकूण
१७०

बनविलेल्या गटांमधून ही रोपे त्यांची निगा राखण्याची जबाबदारीसाठी वाटून दिली. गावातील मोकाट व चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांपासून रोपांचे सरंक्षण करण्यासाठी वाळलेल्या फांद्यांचे तसेच बांबूपासून ४ ते ५ फुट उंचीची सरंक्षण भिंत बांधली. रोपांच्या योग्य वाढीसाठी “ग्रीन हाउस” सारखा प्रयोग ही विद्यार्थ्यांनी राबविला त्यामुळे रोपवाटिकेस नियंत्रित वातावरण पुरविण्यास मदत झाली. रोपांना पाणी झाऱ्याने ग्रामपंचायतीच्या १००० लिटरच्या पाण्याच्या टाकीतून मधल्या सुट्टीत घालायची जबाबदारी प्रत्येक गटाला एक दिवसांप्रमाणे नेमून दिली गेली होती.  हिरवीगार व टवटवीत दिसणाऱ्या रोपांकडे पाहून न चुकता पार पाडलेल्या या जबाबदारीची पोचपावती आपोआप मिळते. याचबरोबर शाळेमध्ये गांडूळ खताचा प्रकल्प सुरु होताच, त्यातून निर्माण झालेला खत विद्यार्थ्यांनी रोपांची मुलद्रव्यांची भूक खत घालून भागविली. यामुळे शाळेतील कुजणाऱ्या कचऱ्याचे उपयुक्त अशा खतामध्ये रुपांतरीत करण्यास व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत झाली.
उपक्रम राबवीत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या. जनावरांपासून रोपे खाण्याच्या भीती पासून ते पाण्यासारख्या कोकणातील भीषण समस्या ही मोठी अडचण होती. रोपावाटीकेसाठी पाणी ही मोठ्या प्रमाणात लागत होते. शाळेत पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे ग्रामपंचायतीची १००० लिटरची सेंटेक्स ची टाकी, ज्याचा मुख्य वापर ग्रामपंचायत कार्यालय व विद्यार्थ्यांसाठी पिण्यासाठी होता. शाळेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मदतीने पाणी झाऱ्याने रोपवाटीकेस उपलब्ध करून दिले जायचे परंतु शाळांना सुट्टी लागताच हे नियोजन निरोपयोगी ठरायचे. मेहनतीने वर्षभर जगविलेली रोपे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या अभावाने मरू नयेत यासाठी १००० लिटरची टाकी योजनेतील निधीअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली. भविष्यात सदर टाकी ही शाळेच्या नवीन इमारतीमध्ये छतावरील पाण्याचे संकलन करून ठेवण्यासही वापरण्यात येणार आहे. शाळेतील शिपाई सुट्टी दरम्यान सदर टाकीतील पाणी रोपांना देऊन त्यांची योग्य ती काळजी घेईल असे नियोजन शाळेने आखले आहे.
या सर्व प्रयत्नातून निश्चितच स्थानिक प्रजातीच्या झाडांची रोपण करून निसर्गाचा समतोल पुनर्वत होण्याची आशा आहे. तंत्रीकबाबी पाहता असे लक्षात येते कि, सुद्रुड व निरोगी रोपे तयार करण्याचा शाळेचा प्रयत्न योग्य मार्गाने चालला आहे. येत्या जुलै २०१४ महिन्या मध्ये सदर १७० झाडांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजित आहे. योजनेंतर्गत सहभागी ५० विद्यार्थ्यांमधील प्रत्येक विद्यार्थी ३ ते ४ रोपांची पुढील २ वर्षांसाठी काळजी घेईल व त्याच्या पुढच्या वर्षीच्या नवीन गटाकडे जबाबदारी सुपूर्त करतील. अशा रीतीने जुनी रोपे सांभाळली ही जातील व नवीन रोपे रोपवाटिकेत तयार करून रोपण ही केले जातील. तसेच रोपे विकत आणण्यापेक्षा या वर्षी बीज संकलन करून त्यांपासून रोप तयार करून रोपवाटिका तयार करण्याचा नवीन संकल्प ही शाळेने हाती घेतला आहे. उन्हाळी सुट्टीच्या आगोदरच योजनाप्रमुखांच्या मार्गदर्शनखाली सर्व गटांनी मिळून आपट्याच्या झाडांच्या बिया संकलित केल्या व उन्हाळी सुट्टी दरम्यान बीज संकलित करावयाच्या उपक्रमाचे थोडक्यात कृतीआधारे प्रशिक्षण ही घेतले. दसऱ्याच्या सणावेळी आपट्याची पाने तोडण्याऐवजी शाळेतील रोपवाटिकेत तयार करण्यात आलेली आपट्याची रोपे भेट देवून साजरा करण्याचा आग्रह केला आहे.
रोपवाटिका हा मुद्दा केंद्र स्थानी ठेवून सदर उपक्रम राबविताना शाळेने गांडूळखत निर्मिती प्रकल्पाद्वारे कचरा व्यवस्थापन, विकत घेतलेल्या पाण्याचे टाकीचे छतावरील पाण्याचे संकलनाद्वारे पाणी संवर्धन, तसेच आपल्या परिसरातील आढळणाऱ्या वनस्पतींचा व त्यांवर अवलंबून असलेल्या सजीवांचा केलेल्या अभ्यासाद्वारे जैवविधता सारख्या संबधित विषयांचे ज्ञान ही मिळविले. पर्यावरण शिक्षणाची सांगड घालत शाळेने स्थानिक पर्यावरण समस्या सोडविण्याचा केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. एका इंग्रजी म्हणीचा नकळत अर्थ हि समजवून गेले- PLANT A TREE, PLANT A HOPE (झाडे लावा, सकारात्मक जीवनाची नवीन आशा निर्माण करा.)
रोपवाटिका

रोपवाटिका 



शाळेतील रोपवाटिका



सुट्टी दरम्यान रोपवाटीकेतील रोपांची निगा राखण्याचे स्वप्रेरनेने काम करताना शाळेचा कर्मचारी श्री. अजित गुरव.


जेवणाच्या सुट्टी दरम्यान रोपांना पाणी घालताना विद्यार्थी.

रोपवाटिका 


रोपवाटिके शेजारील कंपोस्ट खड्डा 



Wednesday, 18 June 2014

नाशिक विभाग- आयुर्वेदीक वनस्पती लागवड यशोगाथा

आयुर्वेदीक वनस्पती लागवड व  त्यांची उत्पादने तयार करणे 

आदिमानवाच्या काळापासून मानव जंगलातील शिकारीबरोबर वनस्पतीकडे लक्ष देऊ लागला. निसर्गचक्राप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींचे रूजणे, वाढणे, फुले व फळे येणे आणि परत बियांपासून त्यांचे पुनरूत्पादन होणे, याचे निरीक्षण केले. निरनिराळ्या वनस्पतींची चव, रूची, ठराविक वनस्पती खाल्ल्याने होणारा परिणाम हेही त्याने अनुभवले. त्या अनुभवाच्या व निरीक्षणाच्या साह्याने त्याने वनस्पतींचे वर्गीकरण केले,यावर  आधारित अनुभवी माणसांची परंपरा तयार होऊ लागली. वनस्पतींमध्ये ताकद देण्याची, वाढविण्याची क्षमता आहे, रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती दिव्य औषधी वनस्पती आहेत, ह्याचे त्याला ज्ञान झाले.या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून (उदा.पाने, मुळे, खोड इ.) तयार केलेले काढे, अर्क,लेप       क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.
          भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या  वनस्पतींचे जतन केले. त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना केल्या. ऋग्वेद, आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार होत गेला. चरक व सुश्रुत ह्यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे.(मराठी विश्वकोश) 
            रकसंहितेमध्ये (मराठी विश्वकोश) ७०० च्या वर औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. इ. स. दुसऱ्या शतकातील ह्या ग्रंथामध्ये वनौषधी व त्यांचे उपयोग इतकेच नाही, तर वनस्पती कशा ओळखाव्यात, केव्हा व कशा रीतीने गोळा कराव्यात, ह्याची देखील नोंद केली गेली आहे.
            वैद्यकशास्त्राचा औषधी विद्यानावाचा एक मुख्य भाग आहे. त्यात औषधीचे वर्णन व औषधी योजना असे दोन पोट विभाग आहेत. औषधी वर्णनात झाडे ओळखणे, त्यांची उत्पत्ती व कोणता भाग वापरावयाचा ह्याचा समावेश आहे. औषधींचे रंग, आकार, विशिष्ट गुण इ. समजावून घेणे महत्त्वाचे आहे. औषधी योजनेत शरीराचे निरनिराळे भाग आणि त्यांवर विशिष्ट औषधींचा होणारा परिणाम व त्यायोगे त्या कोणत्या रोगात कशा प्रकारे वापरावयाच्या हे महत्त्वाचे आहे.   
            महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत जनता विद्यालय कोऱ्हाटे ता.दिंडोरी जि. नाशिक हि शाळा थोडी उंच टेकडीवर असून खडकाळ जमीन आहे.  शाळेतील ५० विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.चव्हाण वाय.एस. यांनी शाळेचा मुख्य उपक्रम  “ आयुर्वेदिक वनस्पती लागवड ” हा निवडला  आहे. गावात जास्तीत जास्त आयुर्वेदिक वनस्पतींचा प्रसार व्हावा या उद्देशाने तसेच स्थानिक लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून गावात सर्वेक्षण करून आयुर्वेदिक वनस्पती लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.


प.से.यो गटाने योजने अंतर्गत शिबिरा दरम्यान काढलेला कोऱ्हाटे गावाचा नकाशा 
प्रथम टप्प्यात शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती लागवड करण्यात आली, अतिशय चांगल्याप्रकारे आयुर्वेदिक वनस्पतीं गार्डन,ठिबकसिंचनासह तयार करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थांना एक  व अधिक आयुर्वेदिक रोपे दत्तक दिले आहे,त्याचे संगोपन,संवर्धन,जतन इ. केले जाते. विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वनस्पतींची बोलीभाषेतील नावे तसेच शास्त्रीय नावे,त्यांचा आयुर्वेदिक उपयोगा विषयी माहिती विद्यार्थ्यानी आत्मसात केली आहे.उदा.तुळस,कडूनिंब,अडुळसा,आवळा,कोरपड,गुळवेल,शतावरी,पळस,पानफूटी,अश्वगंधा,ओवा,पिंपळ,एरंड,फुलझाडे इ.


शाळेच्या नकाशामध्ये दर्शविलेल्या ठिकाणी औषधी वनस्पती लागवड झालेली दुसऱ्या छायाचित्रात देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात आयुर्वेदिक वनस्पती लागवड करून त्या झाडाला स्थानिक नाव व शास्त्रीय नामफलक तयार करून लावण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींचे कोणत्या आजारावर उपयुक्त व त्याची पद्धती याबाबत माहिती संकलित करण्यात आली आहे.अॅलोपॅथी औषधी पद्धती जरी लवकर आजार बरी करणारी असली तरी त्याचे भविष्यात शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते,त्यामुळे  ग्रामीण भागामध्ये सुरुवातीच्या काळापासून आयुर्वेदिक वनस्पती व त्याचे विविध भीषण आजारावर उपयुक्तता याबाबत माहिती होतीच परंतु काळाकाळाने या बाबी मागे पडत आहेत,परंतु विद्यार्थ्यांना बालवयातच या गोष्टींची जाण झाली तर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा ठेवा जतन होण्यास नक्कीच मदत होईल.त्यामुळे औषधी वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन होण्यास नक्की मोलाचा वाटा विद्यार्थी उचलतील याबाबत शंका नाही.
दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी कोऱ्हाटे गावात वेळोवेळी जाऊन प्रभात फेरी काढणे,आयुर्वेदिक वनस्पती संदर्भात जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रश्नावली च्या माध्यमातून  गावातील विविध घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात आयुर्वेदिक वनस्पतीचे माहिती,लागवड,उपयोग इ. गावकऱ्यांकडून त्यांची आयुर्वेदीक वनस्पतीबद्दलची मत जाणून घेण्यात आले.तसेच त्यांच्या घरी आधीपासून असलेल्या आयुर्वेदीक वनस्पती आणि त्यांना गरज असलेल्या वनस्पतींबद्दल माहिती करून घेण्यात आले आणि गावात सर्वेक्षण  करून आल्यावर गावातील लोकांनी लागवडीसाठी सहमती दर्शवली,तसेच काहींनी पहिल्या पासून लावलेली होती.त्यामध्ये सध्या शाळेत किती औषधी वनस्पती उपलब्ध आहे तसेच किती आवशकता आहे, याबाबत संख्यात्मक विश्लेषण करण्यात आले.

कोऱ्हाटे गावामध्ये प्रभात फेरी काढतांना विद्यार्थी.

प्रश्नावली भरून घेतांना विद्यार्थिनी

घोषवाक्य-
१. आयुर्वेदिक वनस्पती लाऊ दारोदारी,आरोग्यसंपदा नांदेल घरोघरी
२.आयुर्वेदिक वनस्पतीचे संवर्धन आपल्या आरोग्याचे संरक्षण
३. औषधी झाडे लाऊ आजारापासून दूर राहू

दोन दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः घरातून,शेतातून आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची जास्तीत जास्त रोपे आणली होती.पहिल्या दिवशी सर्वे केलेल्या घरात विद्यार्थ्यांनी गटाप्रमाणे आणलेल्या औषधी वनस्पतींची गटाप्रमाणे एकूण ११ गटामध्ये वाटणी करण्यात आली .त्यानंतर कोऱ्हाटे गावात जाऊन घराघरामध्ये आयुर्वेदीक वनस्पतींची लागवड करण्यात आली. काही झाडे जास्तीची होती ती कोऱ्हाटे ग्रामपंच्यायत,बगीचा,रस्ते इ. ठिकाणी लागवड करण्यात आली

                                  संख्यात्मक माहिती तक्ता-

एकूण विद्यार्थी
५०


एकूण लागलेले तास

१५
सर्वेक्षण केलेल्या घरांची संख्या
९३


गावामध्ये आयुर्वेदिक वनस्पती लागवड  संख्या
२०२

अ.क्र.
आयुर्वेदिक वनस्पतीचे नाव
संख्या
तुळस
१२
अडुळसा
२५
कोरफड
३७
गुळवेल
१९
कडूनिंब
हळद
११
गवतीचहा
२६
आल
पुदिना
३९
१०
आवळा
१५


ग्रामपंच्यायत कार्यालय कोऱ्हाटे येथे आयुर्वेदिक वनस्पती लावताना विद्यार्थी.

आयुर्वेदिक वनस्पती गावात लावताना विद्यार्थी.

तिसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी  विविध आयुर्वेदीक वनस्पतींपासून औषधी वनस्पती उत्पादने तयार करण्यात आले,त्यामध्ये कोरफड पासून कोरफड जेल तयार करणे,पुदिना पासून पुदिना रस,तुळशीचे चूर्ण,अडुळसा रस, तयार करण्यात आले व ते पारदर्शक बर्णीत संकलित करून नावे लावण्यात आली.तसेच कोणत्या आजारावर काय सेवन करावे  व त्याचे प्रमाण याबाबत माहिती संकलित करण्यात आली इ.उपक्रम  प्रभावीपणे राबविण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे.



            

औषधी उत्पादने तयार करतांना विद्यार्थी,पुदिना रस,कोरफड जेल इ.

शाळा पातळीवर उपक्रम विकसन,विद्यार्थ्यांच्या पर्यावरणीय बाबींची प्रत्यक्ष कृती करतांना विकसित झालेली समज त्यातून भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी बदललेला सकारात्मक दृष्ट्रीकोन,त्याचबरोबर गावपातळीवर केलेले उपक्रम, एकंदरीत पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत शिक्षक,विद्यार्थी,ग्रामस्थ यांच्यामध्ये पर्यावरण शिक्षण या उद्देशाने दृष्टीकोनातून बदल घडवण्यासाठी योजनेकडून पडलेले एक महत्वाचे पाउल आहे.
औषधी वनस्पती लागवड संख्यात्मक माहिती विश्लेषण तक्ता

आयुर्वेदिक औषधी उत्पादने




Tuesday, 10 June 2014

पाणी व मृदा संवर्धनाकरीता शाळेच्या परिसरात खंडीत समतल चर खोदणे.


शाळेचे नाव – सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे

पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी  असणाऱ्या आवश्यक घटकांपैकी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के पाणी व २९ टक्के भूभागाने व्यापलेला आहे. या ७१ टक्के उपलब्ध पाण्यामध्ये समुद्रातील पाण्याचा वाटा ९६.५ टक्के आहे. म्हणजेच ३.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे, या ३.५ टक्क्यातील १.७४ टक्के पाणी बर्फाच्या स्वरुपात आहे. उर्वरित १.७६ टक्के पाणी पिण्याकरिता नदी, तलाव, विहीर इ. मध्ये उपलब्ध आहे.
सध्याच्या काळात बदलत्या ऋतू चक्रामुळे पाण्याचे दुर्भिक्ष तीव्रपणे जाणवत आहे. महाराष्ट्रातील मान्सून हा लहरी आहे. १२० दिवसाच्या पावसाळ्यात सरासरी तीस दिवसात भरपूर पाऊस पडतो व इतर दिवस कोरडेच जातात. त्यामुळे पाणी संवर्धन हि काळाची गरज बनली आहे.
सुमति बालवन शाळा पुणे शहरापासून जवळच असलेल्या कात्रज परिसरात गुजर-निंबाळकरवाडी येथे आहे. सदर शाळा एका छोट्याश्या डोंगरावर वसलेली आहे. शाळा गावापासून उंचीवर वसलेली असल्यामुळे पाण्याचे टंचाई जाणवते. कात्रज परिसरामध्ये सरासरी ८७३ मिमी पाऊस पडतो. परंतु यापैकी बहुतांशी पाणी परिसरातील असलेल्या डोंगर व टेकड्याच्या तीव्र उतारावरून वाहून जाते. अशीच परिस्थिती सुमति बालवनच्या परिसरात आहे. शाळेने या सर्व भौगोलिक बाबींचा अभ्यास करून पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा उपक्रम राबविला आहे. यामधून शाळेतील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजेकारिता पाणी उपलब्ध होते. परंतु शाळेच्या परिसरात लावलेल्या झाडांना वर्षातील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात पाणी मिळू शकत नाही.
सदर समस्येवर उपाययोजना करण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गुळूमकर, योजनाप्रमुख सोनाली बगाडे व पर्यावरण सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक गणेश सातव व भीमाशंकर ढाले यांनी चर्चा केली. चर्चेअंती असा निष्कर्ष निघाला कि शाळेच्या परिसरात चर खांदाव्यात. नागपूर विभागाचे जिल्हा समन्वयक भीमाशंकर ढाले यांनी शाळेच्या परिसरातील जमिनीचा उतार मोजमाप केला असता तो ७ ते ८ टक्के भरला त्या आधारे तसेच स्थानिक पर्जन्यमान, मातीचा प्रकार या आधारावर खंडित  समतल चर तयार करण्यासाठी जागेची निवड अभ्यास केला व खंडीत समतल चर खांद्ण्याची शिफारस केली.
खंडीत समतल चरीचे मुख्य कार्य –
1.      पाण्याची मुरवण करणे
2.      पाण्याचा गतिरोध
3.      पाण्याचा अपधावेध कपात
4.      मृद् – आद्रता वृद्धी
5.      मातीच्या धुपेस आळा.
खंडित समतल चर खोदान्याकरिता आवशक्य असणारी “ A” फ्रेम  विध्यार्थ्यांच्या मदतीने तयार करण्यात आली. तत्पूर्वी “ A” फ्रेम  चा उपयोग विद्यार्थ्यांना जमिनीची समांतर उतार शोधण्यासाठी उपयोग होतो व त्याची गरज समजावून दिली. तसेच मजुरांना “ A” फ्रेम चा उपयोग करून रेखांकन करून दाखवले. खंडित उतार हा विच्छेदित उतार, कमी उतार कमी ते मध्यम उतार अशा भूभागावर केला जातो याची प्रत्यक्षासहित माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सदर चर ह्या  ४ x ०.६० x ०.४५ मी.  लांबीच्या खोदण्याच्या सूचना करण्यात आल्या.
प्रथमतःविद्यार्थ्यांच्या हातात “ A” फ्रेम देवून समांतर उतार शोधण्यास  व त्यानुसार रेखांकन करण्यास सांगितले. त्याचबरोबर चर खांदत असताना घ्यावयाच्या काळजी बाबतही प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी व मजुरांनी चर खोद्ल्याच्या शाळा भेटी दरम्यान निदर्शनास आले..
खंडीत समतल चरचा फायदा अधिक अधिक वृक्षारोपण व पावसाचे पाणी जमिनीत मुराविण्याकरिता होईल. सदर उपक्रम सद्य स्थितीला शाळेच्या परिसरात राबविला गेलेला आहे. भविष्यात गावातील भौगोलिक परिस्थितीच्या आधारे व गरजेनुसार स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने गाव परिसरात राबविला जाईल.
सदर उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांना भूगोल, भूमिती व वनस्पती शास्त्राची माहिती मिळाली. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेल्या संज्ञा प्रत्यक्षरीत्या कशा वापराव्यात याची माहिती मिळाली. चर खांद्ताना मोजमाप कसे घ्यावे, फुटाचे मीटरमध्ये रुपांतर कसे करावे याबाबत शिकायला मिळाले. चर कोणत्या महिन्यात खोदावी व त्याचा फायदा काय होईल याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. पर्यावरण हा विषय प्रत्यक्ष कृतीतूनच शिकायचा आहे. पाणी या विषयाअंतर्गत जल व माती संवर्धनाचा उपक्रम विद्यार्थी संज्ञा व प्रात्यक्षिकातून शिकले.

पावसाळ्याच्या पूर्व संध्येला पर्यावरण सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक व योजनेचे सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीच फायदा शाळेला भविष्यात नक्कीच होईल. शाळेच्या परिसरात पाणी व माती संवर्धनाचा प्रयोग यशस्वी होईल अशी अशा करण्यास हरकत नाही. या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेले विद्यार्थी पुढे जावून गावाच्या पाणी व माती संवर्धनाबाबत नक्कीच महत्त्वपूर्ण योगदान देतील यात शंकाच नाही. 

                           गुजर-निंबाळकरवाडीचे सरपंच व शाळेचे मुख्याध्यापक, योजना प्रमुख यांच्याशी चर्चा करताना प.से.यो.चे अधिकारी


 “ A” फ्रेम पद्धतीने समांतर उताराचे मोजमाप करताना विद्यार्थी


                                                         “ A” फ्रेम पद्धतीने समांतर उताराचे मोजमाप करून रेखांकन करताना विद्यार्थी


                                                                            केलेल्या रेखांकानुसार चर खोदताना विद्यार्थी




                                                                            खोदून पूर्ण  झालेल्या खंडीत समतल चर





Wednesday, 7 May 2014

नवीन शाळा निवड प्रक्रियेसाठी कार्यशाळा
                                                                                  
दिनांक-२५-०४-२०१४ 

स्थळ- राजापूर हायस्कूल, राजापूर.

वेळ- सकाळी-११ वा.


मार्गदर्शक- श्री. दिनेश वाघमारे (जिल्हा समन्वयक- कोंकण विभाग),

                  श्री. गणेश सातव (जिल्हा समन्वयक- पुणे विभाग)

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत सन २०१४-२०१५ साठी नवीन शाळा निवड प्रक्रिया अंतर्गत योजनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १५ शाळांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले होते. जिल्हा समन्वयकांच्या विनंतीनुसार राजापूर विज्ञान मंडळ यांचे अध्यक्ष श्री. गुरव सर यांनी विज्ञान मंडळातील शिक्षकांना फोनवरून संपर्क साधून कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी श्री. अहिरे सर यांच्याशी नवीन शाळा निवड प्रक्रियेबाबत माहिती देण्याकरिता संपर्क साधण्यात आला. दिनांक २४-०४-२०१४ रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या राजापूर व लांजा तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत योजनेबद्दलची माहिती तसेच नियोजित कार्यशाळेस सर्व शाळेच्या प्रतिनिधीना उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन करण्याचे श्री. अहिरे सर यांना राज्य समन्वयक सौ. सुप्रिया निशानदार मॅडम यांनी विनंती केली. कार्यशाळेला एकूण राजापूर तालुक्यातील १३ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. 

सर्वप्रथम सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली,शिक्षकांनी आपला परिचय व यापूर्वी पर्यावरणपूरक केलेले काम व अनुभव याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर उपस्थितीतांना “पर्यावरण सेवा योजने” बद्दलची माहिती सादर केली,त्यामध्ये प्रस्तावना,उद्देश,उपक्रमांची यादी,शाळा निवडीचे निकष,निधी व मानधन यासारखे मुद्दे समजून सांगण्यात आले. उपस्थित शिक्षकांना योजनेबाबत विचारलेल्या शंकाचे निरसन जिल्हा समन्वयकांनी केले. शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेचे नमुना अर्ज,प्रपत्र १ व २ देण्यात आले. सदर पूर्ण भरलेले अर्ज पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे येथे पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

उपस्थित शिक्षकांना माहिती सादर करताना जिल्हा समन्वयक.
उपस्थित शिक्षकांना माहिती सादर करताना जिल्हा समन्वयक