Tuesday, 25 March 2014

नाशिक व जळगाव जिल्ह्यातील पर्यावरण सेवा योजनेतील विविध उपक्रम.

देवठाण ता.दिंडोरी,जि.नाशिक येथील ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक पर्यावरणीय समस्या जाणून घेतांना जिल्हा समन्वयक.

इकोफ्रेंडली शाडू मातीचा गणपती दर्शविताना सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव

पुनर्चाक्रित कागद निर्मिती प्रातेक्षित करतांना सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव
च्या विद्यार्थिनी.

गावातील ई-कचरा सर्वेक्षण व गोळा केल्यानंतरची सांखिकी माहिती सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव
 

सरपंच,सदस्य,ग्रामस्थ यांच्यासोबत संवाद साधतांना जिल्हा समन्वयक.भाऊसो.राजाराम गणू महाजन आदिवासी मा.वि.अभोडा,ता.रावेर,जि.जळगाव.

मी कोण आहे? हा खेळ खेळतांना विद्यार्थी,नूतन ज्ञान मंदिर अडावद,ता.चोपडा,जि.जळगाव

Thursday, 20 March 2014

                         अब घर-घर नहीं फुदकती नन्हीं गौरैया




एक-दो दशक पहले लोगों के घर-आंगन में फुदकने वाली गौरैया आज विलुप्ति के कगार पर है। भारत में गौरैया की संख्या घटती ही जा रही है। इस नन्हें से परिंदे को बचाने के लिए प्रत्येक वर्ष 20 मार्च को विश्व गौरैया दिवस के रूप में मनाया जाता है।

पर्यावरण संरक्षण में गौरैया के महत्व व भूमिका के प्रति लोगों का ध्यान आकृष्ट करने तथा इस पक्षी के संरक्षण के प्रति जनजागरूकता उत्पन्न करने के इरादे से यह आयोजन किया जाता है। यह दिवस पहली बार वर्ष 2010 में मनाया गया था। वैसे देखा जाए तो इस नन्ही गौरैया के विलुप्त होने का कारण मानव ही हैं। हमने तरक्की तो बहुत की लेकिन इस नन्हें पक्षी की तरक्की की तरफ कभी ध्यान नहीं दिया। यही कारण है कि जो दिवस हमें खुशी के रूप में मनाना चाहिए था, वो हम आज इसलिए मनाते हैं कि इनका अस्तित्व बचा रहे।

वक्त के साथ जमाना बदला और छप्पर के स्थान पर सीमेंट की छत आ गई। आवासों की बनावट ऐसी कि गौरैया के लिए घोंसला बनाना मुश्किल हो गया। एयरकंडीशनरों ने रोशनदान तो क्या खिड़कियां तक बन्द करवा दीं। गौरैया ग्रामीण परिवेश का प्रमुख पक्षी है, किन्तु गांवों में फसलों को कीटों से बचाने के लिए कीटनाशकों के प्रयोग के कारण गांवों में गौरैया की संख्या में कमी हो रही है।

प्रकृति ने सभी वनस्पतियों और प्राणियों के लिए विशिष्ट भूमिका निर्धारित की है। इसलिए पर्यावरण संतुलन बनाए रखने के लिए आवश्यक है कि पेड़-पौधों और जीव-जन्तुओं को पूरा संरक्षण प्रदान किया जाए।

गौरैया के संरक्षण में इंसानों की भूमिका सर्वाधिक महत्वपूर्ण है। आवास की छत, बरामदे अथवा किसी खुले स्थान पर बाजरा या टूटे चावल डालने व उथले पात्र में जल रखने पर गौरैया को भोजन व पीने का जल मिलने के साथ-साथ स्नान हेतु जल भी उपलब्ध हो जाता है। बाजार से नेस्ट हाउस खरीद कर लटकाने अथवा आवास में बरामदे में एक कोने में जूते के डिब्बे के बीच लगभग चार सेंटीमीटर व्यास का छेद कर लटकाने पर गौरैया इनमें अपना घोंसला बना लेती है। सिर्फ एक दिन नहीं हमें हर दिन जतन करना होगा गौरैया को बचाने के लिए।

गौरैया महज एक पक्षी नहीं है, ये हमारे जीवन का अभिन्न अंग भी रहा है। बस इनके लिए हमें थोड़ी मेहनत रोज करनी होगी। छत पर किसी खुली छायादार जगह पर कटोरी या किसी मिट्टी के बर्तन में इनके लिए चावल और पीने के लिए साफ बर्तन में पानी रखना होगा। फिर देखिये रूठा दोस्त कैसे वापस आता है।

Wednesday, 19 March 2014

प्रगती विद्यालय रहाटगाव, ता.जि. अमरावती

२० मार्च जागतिक चिमणी दिवस, 

गेल्या कित्येक शतकापासून मानववस्ती जवळ तसेच घरांच्या आजूबाजूला मित्र बनून राहणाऱ्या चिमण्या गेल्या काही वर्षांंपासून कमी होत आहेत. चिमण्यांची संख्या का कमी होत आहे. चिमणी (House Sparrow) Passer domesticus ही प्रजाती जगभरात सर्वत्र परिचित आहे. वाढते औद्योगिकीकरण, विकास आणि शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षात चिमण्यांची संख्या कमी झालली आले. तसेच मागील काही वर्षांत झालेल्या संशोधनानुसार मोबाईल टाॅवर्स हे सुद्धा चिमण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. वाढती लोकसंख्या, सोबतच वाढते प्रदूषण, शेतात तसेच बागेत फवारली जाणारी किटकनाशके त्यामुळे बाधील होणारे चिमण्यांचे खाद्य, हा सुद्धा एक मोठा धोका चिमण्यांची संख्या कमी व्हायला कारणीभूत आहे.  
         २० मार्च 'जागतिक चिमणी दिवसा' निमित्त प्रगती विद्यालय रहाटगाव, ता. जि. अमरावतीच्या पर्यावरण सेवा योजना विद्यार्था गटासोबातच ४१० विद्यार्थांनी एकत्र येऊन चिमणीची प्रतिकृती तयार करून 'चिमणी वाचवा' हा संदेश दिला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चोपडे योजनाप्रमुख श्री. विनोद लेव्हरकर, यांच्या सहकार्याने विद्यार्थांनी चिमणीची प्रतिकृती उभारली.  या उपक्रमाला वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे डॉ. जयंत वडतकर, श्री. वेद पत्की यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. 





Thursday, 13 March 2014

कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशाला, लक्ष्मी रोड, पुणे



पर्यावरण सेवा योजने अंतर्गत राठी प्रशालेच्या विद्यार्थिनीनी महात्मा फुले भाजी मंडईतील  भाजी विक्रेते व ग्राहकांचा प्लास्टिक वापराबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे पुढचे पाऊल म्हणून प्रशालेच्या विद्यार्थिनीनी १५० कापडी पिशव्या बनवून भाजी विक्रेते व ग्राहकांना विकल्या, जेणेकरून प्लास्टिक वापर काही प्रमाणात कमी होईल, तसेच या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याकरिता विद्यार्थिनीनी ७०० कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. सदर उपक्रमात योजना प्रमुख सौ. स्मिता कुलकर्णी, मनीषा पाठक व पर्यावरण सेवा योजना गटाचा उत्साह उल्लेखनीय आहे.

Wednesday, 12 March 2014

भाऊसो.राजराम गणू महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालय,अभोडा,ता.रावेर जि.जळगाव येथील शिबीर बातमी.

शिबीर दिनांक ०६-०२-२०१४ ते  ०७-०२-२०१४ शिबिराचा मुख्य विषय घनकचरा व्यवस्थापन (ई-कचरा,पुनर्चक्रित कागद,पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे,कापडी पिशवी बनवणे,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू,प्लॅस्टिक पिशवी मुक्त गाव) 

Tuesday, 11 March 2014

न्यू इंग्लिश स्कूल, सोलगाव शाळेतील दोन दिवसीय अनिवासी शिबीर.

कोकण विभागातील पर्यावरण सेवा योजने अंतर्गत कार्यरत इंग्लिश स्कूल सोलगाव येथे २५ व २६ जानेवारी २०१४ रोजी दोन दिवसीय अनिवासी शिबीर संपन्न झाले.विद्यार्थ्यांनी  "इ-कचरा" हा प्रमुख मुद्दा समोर ठेवून प्लास्टिक पिशव्यांचे सर्वेक्षण, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे ग्रामस्थांना वाटप, हातकागद बनविण्याचे कौशल्य आत्मसात करणे, पक्ष्यासाठी कृत्रिम घरटी तसेच खाद्यपेटी तयार करणे इत्यादी विषयांवर कृती उपक्रमातून सहभाग घेतला.
शिबिरासाठी योजनेतील ५० विद्यार्थी शाळेच्या आवारातील आंब्याच्या झाडाखाली जमले होते. दिनचर्या समजावून घेवून गटामध्ये विभागाण्यासारखी कृती कार्यक्रमासाठीची पूर्व तयारी केली.

टाळ्या वाजवून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौतुक/स्वागत(हात उंचावून गोल फिरवून) करण्याचा अभिनव प्रयोग केला.

नंतर विद्यार्थ्यांनी इ कचरा व पर्यावरण जनजागृतीसाठी ३ वाड्यामधून रॅली काढली. "इ-कचरा, आरोग्यास खतरा" यांसारख्या कधीच न ऐकलेल्या घोषणेच्या कुतूहलाने लोग घराबाहेर येवून रॅलीचा आढावा घेवू लागले. 

इ कचरा जनजागृती रॅली 

इ कचरा जनजागृती रॅली

इ कचरा जनजागृती रॅली

रॅली संपवून सर्व मुले गंगोबा मंदिर जो कि गावाचा मध्य समजला जातो त्या ठिकाणी जमली. ५ विद्यार्थ्यांचा एक गट असे १० गट ५ वाड्यांमध्ये विभागले व घरोघरी जावून "इ कचरा म्हणजे काय? कोणकोणत्या वस्तू इ कचऱ्यामध्ये येतात? इ कचऱ्याचे संभाव्य धोके काय?" इत्यादी विषयांची माहिती सांगून लोकांना घरामध्ये असणाऱ्या इ कचरा दान करण्याचे आवाहन केले. लोकांनाही दिलेली माहिती व एकंदरीत भविष्यातल्या या ब्राम्हराक्षसाचा रुद्र रूप समजल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तर केलेच व आपल्या घरातील जो काही इ कचरा होता तो दान केला पण इथून पुढे इ कचरा हा उकिरड्यांवर न टाकण्याची ग्वाही हि दिली!

गंगोबा मंदिरासमोर सर्व विद्यार्थी 

इ कचरा हाताळताना योग्य ती काळजी "हँड ग्लोव्झ" वापरून घेण्यात आली.

इ कचरा दान करताना 
संकलित झालेला इ कचरा हा रत्नागिरीतील एखाद्या खेडेगावात अथवा पश्चिम घाटातील एका खेडे गावात इतक्या प्रमणात असू शकतो हे सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे होते. तसे पाहता हे एकूणच किमान प्रमाण आहे यात दुमत नाही!

संकलित केलेला इ कचरा.

२ तासांच्या संकलीकरणाच्या कृतीनंतर विद्यार्थ्यांनी जमा झालेल्या इ कचऱ्यामध्ये असलेल्या विविध प्रकारांचा दास्तैवाजीकरण गटामध्ये बसून केले. 

गट प्रमुखांनी मिळून सर्व गटांनी संकलीत केलेल्या इ कचऱ्याचे सविस्तर सांखिक माहिती दर्शवणारा फलक तयार केला.
दुपारी मुलांनी डबा खाल्यानंतर शिबिराच्या उद्घाटनचा कार्यक्रम आयोजिला होता. शाळेच्या शालेय समितीचे तसेच पर्यावरण सेवा योजना समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, गावचे उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, सेवा निवृत्त शिक्षक व ग्रामस्थ या कार्यक्रमास आमंत्रित व उपस्थित होते. सोलगवाच्या बदलत्या भौगोलिक, वातावरणीय व पर्यावरणाच्या समस्यांवर  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बापट यांनी इ कचऱ्यावर उत्तम असे मार्गदर्शन उपस्थितांना केले, 

वैद्यकीय अधिकारी डॉ. बापट इ कचऱ्यावर मार्गदर्शन करताना.
विशाल बंडबे या विद्यार्थ्याने उपस्थितांना प.से.यो. अंतर्गत केलेल्या कृती उपक्रमांची माहिती दिली. तसेच सकाळी केलेल्या इ कचरा जनजागृती, सर्वेक्षण व संकलीकरनातून समोर आलेली माहिती उपस्थितांसमोर ठेवली व आपल्या गावामध्ये इ कचरा संकलीकरनासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी तयार केलेली "इ कचरा पेटी" ग्रामपंचायत ला भेट दिली. 

विद्यार्थ्यांच्या स्वकल्पनेतून साकारलेली "इ कचरा पेटी",

इ कचरा पेटी भेट देताना उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, मान्यवर व विद्यार्थी प्रतिनिधी.
हा सगळा औपचारिक कार्यक्रम संपविल्या नंतर विद्यर्थ्यांना भारतात एकंदरीत "इ कचऱ्याचे व्यवस्थापन" हे कसे चालते ते माहितीपटाद्वारे दाखविले. हे सर्व त्यांच्या या समस्येला घेवून समज विकसित करण्यात खूप उपयुक्त ठरले. त्यानंतर  जैवविविधता, प्रजनन काळात पक्ष्यांचे नटणे-नाचणे या स्वभाव बदल विषयावर तसेच प्लास्टिक सारख्या गंभीर विषयाशी निगडीत माहितीपट दाखविले. शेवटी दुसऱ्या दिवसाची दिनचर्या सर्वाना समजावून पहिल्या दिवसाची सांगता झाली.

संकलित इ कचऱ्यासोबत योजनेतील सहभागी विद्यार्थी, योजना प्रमुख श्री. सचिन पाटील व इतर शिक्षकवृंद

 दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून ठरल्या प्रमाणे आंब्याच्या झाडाखाली विद्यार्थी जमले. इतर सर्व विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत असताना हे निसर्गप्रेमी आपल्या अकथित कर्तव्य बजावण्यासाठी जमले हे खरोखरच प्रशंसनीय होते! 
आज सर्वांनी मिळून ५ वाड्यातील एकूण प्लास्टिक पिशव्यांचा वापर किती हा शोध घेण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांनी एकरूपी माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षणाचा आराखडा सहविचारातून तयार केला कोणत्याही सर्वेक्षणाचा माहिती संकालीकारणाचा आराखडा हा प्राण! ठरल्याप्रमाणे विद्यार्थी वाड्यामधून प्रत्येक गटामध्ये ५ घरांची माहिती संकलित करून घेवून आली. याच दरम्यान माहिती गोळा केलेल्या घरातील प्रमुखांना एक कापडी पिशवी (विद्यार्थ्यांनीच शिवलेली) भेट दिली. प्लास्टिक पिशवी वापराची माहिती गट प्रमुखांनी एकत्रित करून ती सर्वांसोबत प्रदर्शित केली. 

प्लास्टिक पिशवी वापर सर्वेक्षणातून समोर आलेली सांखिक माहिती दर्शवणारा फलक.

 प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कापडी पिशवीचा वापर उपलब्ध करून प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी टाकलेले एक पाऊल.

शाळेमध्ये प्रत्येक वर्गात कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी तयार होणारा कचरा म्हणेजे "कागद". खिडक्याच्या खाली, बेंच खाली, आवारात असा सर्वत्र पसरलेला हा कचरा! परंतु याची हि व्यवस्था लावणे हे इतर कचऱ्यांप्रमाणे महत्वाचे. शाश्वत विकासाकडे घेवून जाणारे ३ R "REUSE-RECYCLE-REDUCE " मधील पुनर्चक्रीकरण म्हणजेच RECYCLING हा पर्याय वापरून दररोज उत्पन्न होणाऱ्या कागदी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ठरले. पुनर्चक्रित अथवा हातकागद बनविण्याच्या प्रक्रियेतून कागदी कचऱ्या पासून नवीन कागद तयार करणे सहज शक्य आहे. सदर प्रक्रियेचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्षित करून दाखविले व नंतर त्यांना प्रयोग करण्यास सांगितले. सदर उपक्रमातून स्वनिर्मितीच्या आनंदासोबतच पुनर्वापराचे महत्व पटविण्यात मदत झाली. 

हातकागद तयार करताना विद्यार्थी गट.


पुढील अर्ध्या दिवसाच्या टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनविण्याचे तंत्र समजून घेवून, प्लास्टिक सर्वेक्षनादरम्यान गोळा केलेल्या टाकावू प्लास्टिक डब्या(गाडीच्या ओईल, तेलाचे कॅन ई.) पासून घरटी बनविली. तसेच खाद्यपेटी बनविण्याचे तंत्रज्ञान हि समजून घेतले. सदर घरटी शाळेच्या आवारात बसविली असून त्याच्या उचित नोंदी (कोणता पक्षी भेट देऊन गेला, कोणत्या पक्ष्यांनी घरटे स्वीकारले ई.) विद्यार्थी ठेवत आहेत.

तयार केलेल्या कापडी पिशव्या सोबत पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजना प्रमुख.

दोन दिवसाच्या शिबिरांती असे लक्षात येत कि इ कचरा हि समस्या असो वा प्लास्टिक प्रदूषणाची समस्या हि शहरे अथवा गावां पुरतीच मर्यादित राहिली नसून ती सोलगाव सारख्या पश्चिम घाटात वसलेल्या कित्येक खेडे गावामध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे, विकासाचा दर पाहता वेळीच उपाययोजना न आखल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता मुळीच नाकारता येणार नाही.

Friday, 7 March 2014

नागपूर विभागातील पर्यावरण सेवा योजनेचे अनिवासी शिबीर

डॉ.पंजाबराव देशमुख विध्यालयाचे विध्यार्थी इ-कचरा संदर्भात रैली काढण्यात आली.









सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे



पर्यावरण सेवा योजने अंतर्गत गुजर-निंबाळकरवाडी येथील सुमति बालवन शाळेने प्लास्टिक कचऱ्याच्या जनजागृती करण्याकरिता प्रभातफेरीचे आयोजन केले होते. गावातील नागरिकांचा प्लास्टिक पिशवी वापरबाबत सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संरक्षणात विद्यार्थ्यांनी उचललेले हे पहिले पाऊल आहे. 

Thursday, 6 March 2014

माध्यमिक विद्यालय मासोद ,ता.जि .अमरावती.

माध्यमिक विद्यालय मासोद शाळेतील विद्यार्थांनी जिल्हा- समन्वयक तसेच योजना प्रमुख यांच्या उपस्थितीत सांडपाणी व्यस्थापन ह्या विषयाला धरून मासोद गावातील घरांचे सर्वेक्षण केले, २५ घरांच्या सर्वेक्षणादरम्यान  रहिवाशांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत. त्यामध्ये मुख्यता सांडपाण्याचा निचरा कसा केला जातो. ग्रामपंचायतर्फे कुठली व्यवस्था करण्यात आलेली आहे. किती घरांपुढे शोषखड्डे आहे ते बघण्यात आले. सर्वेक्षणातून असे निघून आले की, ग्रामपंचायतर्फे विशेष अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. नाल्या तयार करण्यात आलेल्या आहे परंतु त्यात कचरा पडलेला आहे.


सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर



सावित्री कन्या प्रशाल, रानमसले येथील  विद्यार्थिनी व योजना प्रमुख सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत  शाळेच्या परिसरात शोषखड्डा बनविताना. 

श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, वडाळी , ता.जि .अमरावती.

विद्यार्थ्यांना वडाळी तलावावर असलेल्या पक्ष्यांची माहित देतांना जिल्हासमन्वयक. स्थनिक तसेच हिवाळी स्थलांतरित पक्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.

पक्षीनिरक्षण करतांना विद्यार्थी 

Monocular च्या माध्यमातून पक्षी बघतांना विद्यार्थी 

आलेले अनुभव सांगताना विद्यार्थी